टंचाई आढावा बैठक : टॅग लावण्यास संबंधित छावणीचालकांना मुदतवाढ द्यावी
नगर: जिल्हा प्रशासनाने 15 मे पासून सर्व छावणील जनावरांना टॅग लावणे बंधनकारक केले आहेत. तसेच उद्यापासून सर्व छावणी चालकांना मोबाईल वरून जनावरांची दैनंदिन माहिती पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र अवघ्या एका दिवसात जिल्ह्यातील 493 छावण्यांतील एकूण 3 लाख 9 हजार जनावरांना तुम्ही टॅग कसे लावणार. त्यामुळे टॅग लावण्यास तुम्हाला संबंधित छावणीचालकांना मुदतवाढ द्यावी लागेल, याबाबत योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिल्या.
नगर येथील जिल्हापरिषद पंचायत समितीच्या सभागृहात टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात सध्या 503 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, 493 चारा छावण्या सुरु आहेत. या छावण्यांतील जनावरांची 15 मे पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यासाठी चार छावणी चालकांना टॅग संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.
परंतु अनेक छावणी चालकांनी त्याकडे पाठ फिरवली. जिल्ह्यात सध्या 503 चारा छावण्यांना मंजुरी असून, 493 चारा छावण्या सुरु आहेत. या छावण्यांतील जनावरांची 15 मे म्हणजेच गुरुवार पासून संगणकीय पद्धतीने नोंद करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीने छावणीचालकांना अद्यापपर्यंत टॅंग पुरविले नाहीत. अन्यथा टॅग लावण्यास तुम्हाला संबंधित छावणीचालकांना मुदतवाढ द्यावी लागेल, तसेच छावणीचालकांना जीएसटी लागणार नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.