जेजुरी – जेजुरीचा मुक्काम संपवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने वाल्हेकडे प्रस्थान ठेवले. रिमझिम पावसाच्या सरी व माऊली-माऊलीच्या गजराने जेजुरी माऊलीमय झाली होती. पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी समस्त वारकरी आतुर झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. माऊलींच्या पालखीचे दुपारचे जेवण आणि रात्रीचा मुक्काम वाल्हेत होणार आहे.