मुलांच्या जीवनात त्यांच्या शिक्षकाला महत्त्वाचे स्थान आहे. फक्त एक शिक्षकच मुलाला ज्ञान देतो, जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजावतो. मूल त्याच्या आयुष्यात शिक्षण घेऊन पुढे जाऊ शकते ते केवळ शिक्षकांच्या समर्पित भावनेमुळेच ! विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिक्षकांच्या सन्मानार्थ दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी शाळांमध्ये शिक्षकांचा सन्मान केला जातो.
मुले या दिवशी शिक्षकांची भूमिका जगतात आणि शिस्तबद्धतेखाली संपूर्ण कामकाज त्यांच्या स्वतःच्या जबाबदारीवर चालवतात. मात्र, करोना कालावधीमुळे शाळा बराच काळ बंद होत्या. अशा स्थितीत गेल्या वर्षीपर्यंत मुलांनी शिक्षक दिन फक्त ऑनलाइन माध्यमातून साजरा केला होता. मात्र, यंदा देशातील अनेक ठिकाणी शाळा उघडल्या आहेत, त्यामुळे मुले शाळेत हा दिवस साजरा करू शकतील, असा विश्वास आहे. परंतु या दिवसाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व माहित असणे आवश्यक आहे. तर इतिहासातून या दिवसाचे महत्त्व सांगूया.
भारतात हा दिवस पहिल्यांदा कधी साजरा केला गेला?
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या ‘या’ इच्छेमुळे साजरा होतो शिक्षक दिन !भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर रोजी झाला. हा दिवस साजरा करण्यासाठी एकदा त्यांचे काही शिष्य राधाकृष्णन यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी सांगितले की त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे आणि तुम्ही परवानगी द्या. हे ऐकल्यानंतर राधाकृष्णन म्हणाले की माझा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरा करण्याऐवजी तो ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल. तेव्हापासून त्यांच्या या इच्छेचा मान ठेवीत 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला. 1962 मध्ये भारतात पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
सर्वपल्ली राधा कृष्णन यांनी म्हटले होते की संपूर्ण जग एक शाळा आहे, जिथे एखाद्याला काहीतरी किंवा दुसरे शिकायला मिळते. शिक्षक केवळ शिकवत नाहीत, तर जीवनातील अनुभवातून जात असताना चांगले आणि वाईट यात फरक करायला शिकवतात. मुले हा दिवस त्यांच्या शिक्षकांचा आदर म्हणून साजरा करतात. या दिवशी शाळा, महाविद्यालयात मुले त्यांच्या शिक्षकांना भेटवस्तू देतात, त्यांचे आशीर्वाद घेतात, शिक्षकांसाठी विशेष पार्टी आयोजित करतात.