मुंबई: शिवसेनेवर कुरघोडी करत काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या डोक्यावर छत्र उभारले. दरम्यान, त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. जे शिवरायांच्या पुतळ्यावर छत्र उभारू शकत नाहीत, त्यांची अयोध्येत राम मंदिर बांधायची लायकीच नाही ? असा कणखर टोला राणे यांनी लगावला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत उभारण्याची घोषणा केली होती. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांच्या डोक्यावर छत्र उभारले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
“मुंबई विमानतळाच्या प्रवेशव्दाराजवळ शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटे उभे करून ठेवले आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा शिवसेना तिथे रायगड उभा करेल” तिथीनुसार शिवजयंती साजरी करताना उद्धव ठाकरेंनी असा इशारा दिला होता.
आम्ही दिलेले शब्द पाळतो !!
पहिले आमचे छत्रपती..
मग जाऊन करा अयोध्या मध्ये आरती!! pic.twitter.com/FxqhSTDsLK— nitesh rane (@NiteshNRane) November 23, 2018
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा