भारतीय क्रिकेट संघाची यंदाच्या वर्षातील कामगिरी ही उत्तम होती. वर्षाच्या सुरवातीला इंग्लड विरुद्धची वन डे मालिका भारतीय संघाने जिंकली . त्यानंतर चिन्नस्वामी मैदानावर झालेल्या इंग्लडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी 20 सामन्यात भारताने पाहुण्यांना 127 धावात उखडून ही लढत 75 धावांनी जिंकली . बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत 204 धावांची खेळी करून भारताच्या विराट कोहलीने अभेद्य भिंतीप्रमाणे उभा राहणारा राहुल द्रविड आणि क्रिकेटचे पितामह सर डॉन ब्रॅडमन याना मागे टाकून सलग 4 मालिकांमध्ये द्विशतक झळकविण्याचा पराक्रम केला .
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0