सातारा – सातारा शहराचे उपनगर असलेल्या करंजे परिसरातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या कडेला महानुभव मंगल कार्यालयासमोरील रस्त्यावर नेहमीच कचऱ्याचे ढिग पडू लागले आहेत. रात्रीच्या वेळी काही मटणविक्रेत्यांकडून या रस्त्याकडेला मटण शॉपमधील कचरा टाकला जात आहे.
त्यामुळे याठिकाणी भटक्या कुत्र्यांचीही संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळी ही कुत्री रस्त्यावरच भुंकत असल्याने वाहनधारकांचे किरकोळ अपघातही घडू लागले असून संबंधित मटणविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0