मुंबई – २०१९ लोकसभेत काँग्रेसचा जोरदार प्रभाव झाल्यामुळे संपूर्ण पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्षात राजीनामा सत्र सुरु झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्ज नेत्यांचा पराभव झाला आहे. निकाल नंतर आज प्रथमच अशोक चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी राज्यातील अन्य प्रदेशाध्यक्षांनी देखील हीच भूमिका घ्यावी असे सांगितले. जेणेकरून आगामी निवडणुकीत तरुण नेत्यांना संधी देता येईल.
या निवडणुकीत अशोक चव्हाण हे नांदेड मतदारसंघातून पराभूत झाले असून, भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी प्रभाव केला आहे.